“सुंदर व शांत मुक्ताईनगरसाठी नागरिकांचा आक्रोश – सीसीटीव्ही, पाणी व अपंग सुविधांवर नगराध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा!”मुक्ताईनगर

“सुंदर व शांत मुक्ताईनगरसाठी नागरिकांचा आक्रोश – सीसीटीव्ही, पाणी व अपंग सुविधांवर नगराध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा!”मुक्ताईनगर –“सुंदर मुक्ताईनगर, शांत मुक्ताईनगर” ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरावी, अशी ठाम मागणी आता मुक्ताईनगरच्या सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, असुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आणि अपंग नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच संवेदनशील भाग नगराध्यक्षांच्या थेट अखत्यारीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याखाली आणावेत, अशी ठोस मागणी नागरिकांनी केली आहे. सीसीटीव्ही केवळ नावापुरते न राहता ते कार्यरत, देखभालयुक्त आणि पोलिस प्रशासनाशी समन्वय साधणारे असावेत, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.यासोबतच मुक्ताईनगरमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या मूलभूत प्रश्नाकडे नगराध्यक्ष व नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली आहे.तसेच मुक्ताईनगरमधील अपंग बांधवांसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा – रॅम्प, स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सोयी-सुविधा, आरोग्य व सामाजिक मदत योजना त्वरित उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी होत आहे. विकासाच्या गप्पांमध्ये अपंग नागरिक कायम दुर्लक्षित राहणे ही सामाजिक अन्यायाची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर नगराध्यक्ष व प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर नागरिकांचा रोष अधिक तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात येत आहे.“विकास कागदावर नको, तर रस्त्यावर दिसावा” हीच आता मुक्ताईनगरवासीयांची ठाम अपेक्षा आहे.



