खानदेशजळगावा जिल्हा

भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मैत्री व करुणेचा संदेश हाच मानवाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू आहे – पूज्य भिक्खुनी विसुत्ती याना

जळगाव :- आज जगात माणसा माणसात प्रचंड राग , द्वेष , मोह वाढलेला. आहे , माणसा माणसात संघर्ष वाढत आहे , या संघर्षातून विनाश घडत आहे अश्या प्रसंगी प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सुखाने , शांततेने , निर्भयतेने जगता येण्या करिता भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मैत्री , करुणा या तत्त्वांचा अंगीकार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बुद्ध चतु परीसा भिक्खुनी संघ , थायलंड च्या प्रमुख पूज्य भिक्खुनी विसुत्ती याना यांनी केले .
अजिंठा हौसिंग सोसायटी च्या मैदानात झालेल्या जाहीर धम्मदेसना प्रसंगी जनतेस संबोधित करताना अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या .
विसूत्ती याना यांनी पुढं सांगितले की बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार करण्या करिता थायलंड , ब्रम्हदेश , श्रीलंका आदी देशांमध्ये भिक्खुनी मोठ्या संख्येने पुढं येत आहेत .
या प्रसंगी पूज्य भिक्खुनी वीसुत्ती याना यांचा जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ , ॲड. आनंद कोचुरे , संघमित्रा चव्हाण , ज्योती भालेराव , चेतन नन्नवरे , दिलिप सपकाळे , कविता सपकाळे , यांच्या हस्ते मानचिन्ह , मानपत्र , चिवर , बुके देऊन सन्मान करण्यात आला . या प्रसंगी उपस्थित सर्व जनतेने उभे राहून त्यांना अभिवादन केले .
या प्रसंगी मंचावर विज्जा विमुत्ती , चिरावरना , समुद तेजना , वितक्का विचारा, विशाखा , अभिन्ना , सुनंदा बोधी , करुणा शिला ई. बौद्ध भिक्खुनी उपस्थित होत्या .
जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी भूमिका विषद केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका व श्रामणेरी संघमित्रा चव्हाण यांनी केले .
अजिंठा हाउसिंग सोसायटी चे चेअरमन दिलिप सपकाळे यांनी परिचय करून दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव, मानपत्राचे वाचन गीता सोनवणे , परिचय ममता सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. आनंद कोचुरे यांनी केले .
प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या बा तथागता या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षा कोचुरे , रजनी सैंदाणे , पूनम वानखेडे , अर्चना पवार , सुनंदा वाघ , नूतन तासखेडकर , विजया शेजवळे, भारती सपकाळे , मनीषा भालेराव , सुनंदा सैंदाणे, सविता सोनवणे , पूजा कोचुरे , पूजा भालेराव , चारुशीला सुरडकर , सुमन बैसाने यांनी परिश्रम घेतले.
सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रि सरण , पंचशील ग्रहण करण्यात आले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती ते अजिंठा चौक पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली . या नंतर सर्व भिक्खुनी यांनी अजिंठा सोसायटीतील प्रत्येक घरी जाऊन चारिका केली . या सर्व कार्यक्रमात पाचशे किलो फुलांची उधळण करण्यात आली. जागोजागी रांगोळी काढून रस्ते सुशोभित करण्यात आले होते . या समारंभास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक आले होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button