“उशिरा झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीला मोठा फटका; शेतकरी चिंतेत.”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुखा: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली: तालुख्यातील : बोरगाव काकडे गाव
राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पेरणीला विलंब झाला आहे. ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, अनेक गावांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी रखडलेली आहे.
शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, बियाणे आणि खतांची तयारी पूर्ण केली असली तरी पावसाअभावी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, पेरणी जितकी उशिरा होईल तितका पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.
उशिरा झालेल्या पेरणीमुळे पिकांना वाढीसाठी कमी कालावधी मिळतो. त्यामुळे फुलोरा, शेंगा भरणे आणि धान्य तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
दुसरीकडे, काही भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागून आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास उर्वरित पेरणी पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.✍️



