विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

…. स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे/////////////////////////////// जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये नगर,नाशिक जिल्ह्यात खरिपातील लाल कांद्याचे भाव कमी झाले .म्हणून सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली . परंतु विदर्भातील कांदा सततच्या अवकाळी पावसाने पूर्णपणे सडून गेला . एकरी 50 ते 60 हजार रुपये लागलेला लागवडीचा खर्चही भरून निघत नाही . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कांद्याला सरकारने नुकसान भरपाई द्यावी म्हणून निवेदन देऊन आंदोलने झाले.मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले तरीसुद्धा कांदा नुकसानीचा पंचनामा नाही .शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक दमदीची सुद्धा मदत नाही .अजूनही हे नालायक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कांद्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी का बोलत नाहीत नागरिकांनी यांचा जाब विचारला पाहिजे… कापूस पडला शेतकऱ्याच्या घरी… कांदा पडला बांधावरी…आणि हे सरकार म्हणताय शासन आपल्या दारी….. कृष्णा भिसे पाटील एक शेतकरीपुत्र



