जनतेने संधी दिली जनतेच्या विश्वासाला वंचित बहुजन आघाडी जगात आहे.

संभाजीनगर
जनतेने संधी दिली जनतेच्या विश्वासाला वंचित बहुजन आघाडी जगात आहे.
भीमनगर, निसर्ग कॉलनी येथे वंचितची “जनतेसाठी पाणी सेवा.”
औरंगाबाद शहरातील नागरिक गेल्या तीन दिवसांपासून गंभीर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः स्वयंपाक, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता आणि आरोग्यविषयक गरजांवर याचा गंभीर फटका बसला आहे.
स्थानिक आमदार आणि खासदार यांना वारंवार विनंत्या करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. या परिस्थितीत, गरजू नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे.
भीमनगर, निसर्ग कॉलनी, संविधान चौक, लुंबिनी चौक, विश्रांती चौक अशा विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग ३ च्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत.
जनतेने नगरसेवक म्हणून संधी दिल्यानंतर जनतेची कामे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून काम करण्याचा निर्धार या पाणी सेवेतून दिसून आला.



