घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी ह्या वार्डातील कचरे घेत नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीस ! नगरपंचायत मुख्य अधिकारी यांचे यावरती नियंत्रण नाही.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर मध्ये गेल्या चार ते पाच महिन्यापासून गेलेली सदर परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची दिसून येत आहे.
प्रवर्तन चौक मधील काही घनकचरा व्यवस्थापनाच्या घंटा गाड्या ह्या नागरिकांच्या प्रभागामधील केरकचरा कोसळण्यास असमर्थ. घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्या ह्या वेळेवरती येत नाही गेल्या चार चार ते पाच पाच दिवस या गाड्यांचा कुठलाही प्रकारची माहिती मुख्याधिकारी यांना विचारणा केलेली असता त्यावरती त्यांनी कुठले प्रकारचे प्रत्युत्तर दिलेले नाही किंवा मी बघून सांगतो या स्वरूपामध्ये सुद्धा त्यांनी माहिती नागरिकांना दिलेली नाही तरी मुक्ताईनगरचे प्रशासकीय कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदारावरती कुठल्या प्रकाराची कारवाई करतील अशी नागरिकांमध्ये चर्चा निर्माण झालेली आहे.
एकूण मुक्ताईनगर मध्ये 17 प्रभाग असल्यावरती देखील मुक्ताईनगरचे मुख्य अधिकारी यावरती कुठल्या प्रकारचे कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे..
पहिलेच पाऊसाचे दिवस चालू असून साथीच्या रोगां नी थैमान घातले आहे. त्यात कचरा याची विल्हेवाट लागत नसल्याने, मोठ्याप्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी सदरील ठेकेदाराची मुदत ही 2024 मध्येच संपलेली असून हा ठेकेदार जर काम करत नसेल तर त्याला tendering न करता मुदत वाढ का देण्यात येत आहे, ह्या विषयाची चर्चा जनतेत सध्या दबक्या आवाजात सुरु आहे.
सदर बाजारातील केरकचरा व्यवस्थापनाची देखील त्याच परिस्थितीने हाल सुरू आहे त्यामुळे मुक्ताईनगर येथील स्थानिक नागरिक व ग्रामस्थ यांची दयनीय अवस्था झालेली आहे.
प्रशासन याकडे कशा पद्धतीने कारवाई करेल. याची नागरिक.



