सामाजिक

खामगाव तालुक्यात गुंजणार परिवर्तनाचा निनाद! वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा उद्यापासून खामगाव तालुक्यात; महिला मेळाव्याने होणार सुरुवात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(खामगाव): जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीची गाजत असलेली परिवर्तन रथयात्रा आता उद्या, १ मार्चपासून खामगाव तालुक्यात येत आहे.
खामगाव तालुक्यातील ८० गावात ही रथयात्रा पोहोचणार असून रथयात्रेची सुरुवात उद्या दुपारी खामगाव शहरात होणाऱ्या महिला मेळाव्याने होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या गुरुद्वारा हॉल, काँग्रेस भवन येथे हा महिला मेळावा होणार आहे.
जिल्ह्याच्या मागासलेपनाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीची सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन करण्यासाठी संदीप शेळके यांनी कंबर कसली फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू केली. गेल्या १९ दिवसांत मोताळा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील गावोगावी पोहोचून संदीप शेळके यांनी परिवर्तनाची साद घातली. तिनी तालुक्यांत या यात्रेचे दमदार स्वागत झाले, तिन्ही तालुक्यात या यात्रेचे दमदार स्वागत झाले, तीन तालुक्यातील अभूतपूर्व प्रतिसादनंतर ही रथयात्रा आता खामगाव तालुक्यात येत आहे. महिला मेळाव्याने प्रारंभ झाल्यानंतर खामगाव शहरातील विविध चौकांत संदीप शेळके जनतेशी संवाद साधत कॉर्नर मीटिंग घेणार आहेत.

खामगाव येथे होणार कॉर्नर सभा…

खामगाव शहरातील गांधी चौक, मस्तान चौक, जय भवानी चौक, चांद मारी चौक, टावर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फरशी चौक, मेहबूब नगर, शंकर नगर, बाळापुर फैल या भागात वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके जनतेची संवाद साधणार आहेत.
लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संवाद मिळावे जानेवारीला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेडराजा ते संत नगरी शेगाव ही श्रीराम वंदना यात्रा देखील चांगलीच गाजली. त्यानंतर ३ फेब्रुवारीला बुलढाण्यातील साईकृपा लॉन्स वर झालेल्या बूथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यातच मायबाप जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगत शेळके यांनी जिल्ह्याच्या परिवर्तन रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.
दरम्यान ठरलेल्या नियोजनाप्रमाणे या रथयात्रेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी संदीप शेळके यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. संदीप शेळके देखील फ्रंट फुटवर येऊन जिल्ह्याच्या मागासलेपणाला जबाबदार कोण? जिल्ह्याचा विकास कशामुळे खुंटलाय? असे सवाल उपस्थित करून थेट प्रस्थापित ाजकीय पुढार्‍यांना फैलावर घेत आहेत. एकंदरी जिल्ह्याच्या राजकारणात वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेने जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना उरात धडकी भरवली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button