Uncategorized

मीना मंच अंतर्गत शाळेत पत्रावळी व द्रोण करणे स्पर्धा .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव -: येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळा येथे गणेशोत्सवानिमित्त मीना मंच अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्याचा विकास व्हावा याकरिता पत्रावळी व द्रोण तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने शाळेतील वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला विद्यार्थ्यांनी स्वतः पळसाचे पाने घेऊन त्यापासून पारंपरिक पद्धतीने पत्रावळी व द्रोण या ठिकाणी तयार केल्यात.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना पत्रावळी व द्रोण याबद्दल माहिती व्हावी व विद्यार्थ्यांना निसर्गातील या अनमोल ठेवीची माहिती व्हावी व प्रदूषण वाचवण्यास आपलां हातभार लागावा या उद्देशाने पारंपरिक पद्धतीने ही पत्रावळी तयार करण्याची स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेला प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे व प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी नेहा गायकवाड, सुषमा शिंदे यांनी उपस्थित राहून या स्पर्धेचे परीक्षण केले. सदर स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थी क्रमांक काढण्यात आले. आर्यन वाठोरे- प्रथम क्रमांक,
नंदिनी ढवळे- द्वितीय क्रमांक,
धनश्री कंकाळ- तृतीय क्रमांक,
शेख कबीर- प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन सुषमा इंगळे यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम पार पाडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button