एकही आमदार खासदार जनतेशी प्रामाणिक नाही.

आता लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे.त्यात अनेक तिसमारखे प्रामाणिकपणाचा आव आणत उमेदवारी करीत आहेत.आणि त्यांचे पक्षनेते ही.पण अजूनपर्यंत एकाही नेत्याने आमदार खासदार मंत्री च्या अल्पकालीन श्रीमंती बाबत उघड केले नाही.नको!आपणच ही असेच श्रीमंत झालो आहोत.तर मग,कशाला हे उघड करायचे?दुसऱ्याचे कपडे ओरबाडले तर आपण ही नागडे होणारच.म्हणून तेरी भी चूप ,मेरी भी चूप.जोपर्यंत मतदारांना हे कळत नाही. तोपर्यंत असेच चालणार.खरे म्हणजे कळूच द्यायचे नाही,असा गुप्त ठराव यांनी विधानसभेत आणि लोकसभेत केलेला असावा.
मला वाटते,ही जबाबदारी,ही मोहीम आता मतदारांनी हाती घ्यावी.आमचा तुमचा आमदार खासदार जर प्रामाणिक नसेल तर आपणच ते धाडस केले पाहिजे.आपले गांव,आपला तालुका, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश आपणच सांभाळला पाहिजे.
कांग्रेस आमदार खासदारांनी याचे गुपीत मतदारांना सांगितले नाही.त्यांनी चोऱ्या केल्या. ते खूप उशीरा लोकांना कळले.पण आम्ही भाजपचे आमदार खासदार निवडून दिलेत. त्यांनी तरी कुठे सांगितले कि, आमदार खासदार असे माल कमावतात .नाही हो! हे सुद्धा जनतेशी प्रामाणिक नाहीत.
तुम्ही एखादा कांग्रेसचा किंवा भाजपचा आमदार पकडा.किंवा खासदार पकडा.त्याला विचारा,सांग रे नाऱ्या,तू इतक्या कमी काळात मालामाल कसा झाला?इकडे रस्ते नाहीत,आणि तू श्रीमंत?इकडे गटार नाही,आणि तू श्रीमंत?इकडे सरकारी शाळा बंद आणि तू श्रीमंत?इकडे सरकारी दवाखाने उजाड आणि तू श्रीमंत?
मी तर हे आमदार खासदार ला विचारले तर ते विषय टाकून पळून जातात.कोणीतरी वाळीत घातलेल्या आमदार किंवा खासदार ने तरी हे खरे खरे सांगावे.पण नाही!
माझ्या जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील रोज कुठे ना कुठे कुदळ मारून उद्घाटन करतात.पण हा रस्ता कोणत्या निधीतून,किती किमतीचा,किती लांबीचा,प्रस्ताव कधी टाकला, मंजूर कधी झाला?असे काहीच सांगत नाहीत.मंत्रीने प्रस्ताव प्रत,मंजूरी ची प्रत ,वर्क ऑर्डर ची प्रत कुदळ मारून खाच करतात तेथेच दिली पाहिजे.जे जे प्रस्ताव टाकले ते ते त्याच दिवशी ऑनलाईन केले पाहिजे.मंजूरी,वर्क ऑर्डर,इस्टीमेट,एम बी,कम्प्लीशन ऑनलाईन केले पाहिजे.अशी सुचना आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच ने जळगाव महापालिका, जळगाव झेडपी, जळगाव सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना केली. तर ,म्हणे आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे.साफ खोटे.ही माणसे लबाड ,बदमाष आहेत.जे जे डाक्युमेंट तयार होते ते ते ऑनलाईन टाकायला एक मिनिट लागतो.पण जाहिर करायचेच नसेल तर ही बहाणेबाजी करतात.मुख्य हेतू चोरी करणे.म्हणून नागरिकांना अंधारात ठेवणे.
कालच जळगाव शहरातील शिवाजीनगर मधील राजमालतीनगर मधील महिला आमदार भोळेंकडे रस्ता साठी तक्रार घेऊन गेल्या.तर म्हणे रस्ता मंजूर आहे.लवकरच बनेल.त्या महिलांना आमदारांनी तसा प्रस्ताव, मंजूरी , वर्क ऑर्डर दिली पाहिजे.किंवा रस्ता बनणारच नाही,असे प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे.पण नाही.येथे चोरी करायची आहे.लोकांना मुर्ख बनवायचे आहे.हे आता थांबवले पाहिजे.ते आम्ही थांबवणार.
जळगाव शहरातील चार रस्ते आधी डांबरीकरण मंजूर केले.नंतर सिमेंट चे मंजूर केले.पुन्हा तेच डांबरी बनवत आहेत.हा मुर्खपणा आहे कि बदमाषी?इतका घोळ आणि खेळ जळगावची उच्चशिक्षित जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.जनता गुलामासारखे वर्तन करते आणि आमदार मालकासारखे.जरी जळगाव ला महानगरपालिका आहे, कलेक्टर आहे,विद्यापीठ आहे.तरीही?
आमदार भोळे किंवा गुलाबराव पाटील यांना शहाणे करण्यात वेळ न घालवता आपण जागृत नागरिक हे काम करणार आहोत.मिळालेला निधी,वितरीत निधी, उपलब्ध निधी,कामाची यादी,कामाचा प्रस्ताव, मंजूरी, इस्टीमेट, टेंडर, वर्क ऑर्डर,एम बी , कम्प्लीशन असे त्या त्या दिवशीच जाहिर करणार आहोत.जेथे काम चालू तेथे स्थानिक नागरिकांची देखरेख समीती स्थापन करणार आहोत.कामाची गुणवत्ता,कामाचे प्रमाण,बील पेमेंट चे प्रमाण,असे ताबडतोब जाहीर करणार आहोत.रस्ता बांधकाम सुरू करण्या आधी स्थानिक नागरिकांची सभा,पुर्ण झाल्यानंतर पुन्हा सभा घेऊन पाहिजे त्याला शासकीय आणि तांत्रिक माहिती देऊ.यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी यांना जनतेसमोर उत्तर देण्यास बांधील करू.पैसा जनतेचा आहे, रस्ता जनतेसाठी आहे,तर जनतेला पै पै चा हिशोब द्यावाच लागेल.रस्ता बांधकाम सुरू करण्याआधी संबंधित आमदार किंवा नगरसेवक किंवा खासदार किंवा मंत्री यांचा फोन नंबर , मक्तेदार,त्याचा अभियंता, महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे फोन नंबर बोर्डवर प्रदर्शित केले जातील.समस्या आढळली तर ताबडतोब फोन करून बोलवता येईल.उत्तर द्यावेच लागेल.नाहीतर नोकरी नाहींच.
या प्रकारे पारदर्शकता अनुसरली तर कोणीही आमदार खासदार किंवा मंत्री मक्तेदार कडून कमीशन घेणार नाही.असा प्रकार आजही घडतो.पण कमीशन देणारा चोर आणि घेणारा चोर पैकी कोणीही उघड करीत नाहीत.पण दोघांपैकी एकतरी प्रामाणिक असला तर नक्कीच हे पारदर्शक होईल.यात आपण आपला आमदार खासदार मंत्री प्रामाणिक देऊ शकतो.हे तर आपल्या एका बोटांचे काम आहे.मतदान करणे.जर इलाज आपल्याकडे आहे तर पोलिस आणि कोर्टात का हेलपाटे घालाव्यात?
हा बदल करण्याची जबाबदारी आमची.महाराष्ट्र जागृत जनमंच ची.पण अट एकच !मतदारांनी मत विकू नये.
..शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



