
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी सरसावली तरुणाई..
अँकर: कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जिल्ह्याला मागासलेपणाचा लागलेला कलंक पुसून टाकण्याचे कंगण उराशी बाळगून संदीप शेळके यांनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे.. यापूर्वी संदीप शेळके यांनी सहकार, उद्योजकता, शिक्षण या क्षेत्रासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.. तर आता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांनी मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून आपल्या परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात केली आहे, मोताळा आणि शेगाव अशा दोन तालुक्यांमध्ये या परिवर्तन रथ यात्रेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दनानल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून टाकण्यासाठी तरुणांकडून गावागावात परिवर्तनाचा आवाज.



