खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

‘साध्या पोस्टाची जबाबदारी आमची नाही’ म्हणणाऱ्या पोस्ट कार्यालयाला जाब कोण विचारणार? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी

मुक्ताईनगर पोस्टाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; दोन महिन्यांपासून साधी पत्रे बेपत्ता?‘साध्या पोस्टाची जबाबदारी आमची नाही’ या उत्तराने नागरिक संतप्त; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणीमुक्ताईनगर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त आणि सुलभ पत्रव्यवहाराचे माध्यम म्हणून टपाल व्यवस्थेकडे पाहिले जाते. मात्र, मुक्ताईनगर येथील पोस्ट कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, साध्या पोस्टाने पाठविलेली पत्रे दीर्घकाळ प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, साध्या पोस्टाने पाठविलेली काही पत्रे तब्बल दोन महिन्यांनंतरही संबंधित व्यक्तींना मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे, या पत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘साध्या पोस्टाची जबाबदारी आमची नाही’, अशा स्वरूपाचे उत्तर मिळत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. या उत्तरामुळे पोस्ट कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.१५ पत्रांपैकी अनेक पत्रे अद्याप अप्राप्तदेवेंद्र काटे यांनी १० जुलै रोजी साध्या पोस्टाने १५ पत्रे विविध ठिकाणी पाठविल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी मुक्ताईनगर येथील तीन पत्रांचाही अद्याप संबंधितांना पत्ता लागलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यातील एक पत्र पोस्ट कार्यालयाच्या परिसरातील व्यक्तीला द्यायचे असल्याचे सांगण्यात येते; तरीही ते पत्र संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा आहे.पुणे, जळगाव, भुसावळ, बोदवड आणि बऱ्हाणपूर आदी ठिकाणी पाठविलेल्या पत्रांबाबतही पाठपुरावा करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘आमच्याकडे विवरण उपलब्ध नाही’ अशा प्रकारची माहिती मिळत असल्याचे काटे यांनी सांगितले.गरीब नागरिकांनी पत्रव्यवहार करायचा तरी कसा?आजही अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी साधी पोस्ट हा कमी खर्चातील पत्रव्यवहाराचा पर्याय आहे. अर्ज, कागदपत्रे किंवा महत्त्वाची माहिती पाठविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला महागड्या पर्यायांचा वापर करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत साध्या पोस्टाच्या माध्यमातून पाठविलेले पत्रच वेळेत पोहोचत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी आपला पत्रव्यवहार करायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जर साध्या पोस्टाची सेवा उपलब्ध करून दिली जाते, तर त्या सेवेतून पाठविलेल्या पत्रांच्या वितरणाबाबत निश्चित कार्यपद्धती आणि जबाबदारी असणे अपेक्षित आहे. त्यामुळे साध्या पोस्टाची जबाबदारी नेमकी कोणाची? पत्र विलंबित किंवा अप्राप्त झाल्यास नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची? या प्रश्नांची उत्तरे पोस्ट विभागाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का?मुक्ताईनगर पोस्ट कार्यालयातील या कथित प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साध्या पोस्टाने पाठविलेल्या पत्रांची नोंद, त्यांचे वर्गीकरण, संबंधित वितरण केंद्रापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आणि अंतिम वितरण याबाबत उपलब्ध नोंदी तपासल्या गेल्यास नेमकी समस्या कुठे निर्माण होत आहे, हे स्पष्ट होऊ शकते.नागरिकांच्या तक्रारी खऱ्या असतील तर त्याची जबाबदारी निश्चित होणार का? आणि तक्रारीत तथ्य नसेल तर वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट केली जाणार का? हा खरा प्रश्न आहे.टपाल विभाग हा सामान्य नागरिकांच्या विश्वासावर चालणारा सार्वजनिक सेवा विभाग आहे. त्यामुळे ‘जबाबदारी आमची नाही’ अशा उत्तराने प्रश्न संपत नाही; उलट त्या प्रश्नाची अधिकृत चौकशी होणे आवश्यक ठरते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवावा आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.साधी पोस्ट गरीब आणि सामान्य नागरिकांसाठी आहे; त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार असेल, तर या व्यवस्थेला जाब कोण विचारणार? हा सवाल आता मुक्ताईनगरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button