जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

“धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” बाबत जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली आढावा बैठक…

जळगांव येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासह आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” (धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान) योजनेचा आढावा घेऊन योजना योग्यरित्या राबविणे बाबत सबंधित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या.

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी “धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” योजनेचा प्रारंभ केला. मोहिमेचे उद्दिष्ट देशतील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील 63,000 हून अधिक आदिवासी बहुल गावांना विकेंद्रीकरण प्रदान करण्याचे आहे. मोहिमेअंतर्गत, 17 मंत्रालयांचे समन्वित प्रयत्न पुढील 5 वर्षांत 25 योजनांवर लक्ष केंद्रित करतील.

धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान चे उद्दिष्ट सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविकेतील गंभीर कमतरता दूर करणे आणि भारत सरकारच्या 17 मंत्रालयांद्वारे राबविण्यात आलेल्या 25 उपक्रमांद्वारे आणि पोहोचून आदिवासी क्षेत्रे आणि समुदायांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणे हे आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button