निसर्गाचा तडाखा: जळगाव जामोद-संग्रामपूरमध्ये शेती उद्ध्वस्तस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी सलमान पठाण

वादळी वाऱ्याने शेतीचे मोठे नुकसान; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांची नुकसानग्रस्त भागांना भेट
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या मा. जयश्रीताई शेळके आणि जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासनही देण्यात आले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख गजाननभाऊ वाघ, उपजिल्हाप्रमुख तुकारामभाऊ काळपांडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभमभाऊ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशालभाऊ पाटील, विधानसभा अध्यक्ष भिमरावभाऊ पाटील, तालुकाप्रमुख रवीभाऊ झाडोकार, शहरप्रमुख रमेशभाऊ काळे, उपतालुकाप्रमुख विजयभाऊ मारोडे, युवा विधानसभा संघटक अजयभाऊ घिवे, विभाग प्रमुख राजूभाऊ पाटील, सरपंच राहुलभाऊ मेटांगे, राजूभाऊ सुसर, सोशल मीडिया प्रमुख गोपालभाऊ पाटील, अभयभाऊ मारोडे, मनोजभाऊ वाघ, अतुलभाऊ बांगर, सोहमभाऊ मारोडे, जयभाऊ मेटांगे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.



