महाराष्ट्रमुबई

अपुरा पाणीपुरवठा, खड्डड्यांनी वसई-विरारचे नागरिक हैराणमहापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

बाळू साळवे
मुंबई बीरो चीप
३१ ऑगस्ट २०२३ गुरुवार

विरार : वसई विरार शहरातील खड्डेमय रस्ते तसेच पावसाळ्यातही नागरिकांना – होणारा अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच अनुषंगाने पालिकेच्या मुख्यालयाच्या दालनात मंगळवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी दीड तास ठिय्या आंदोलन केले.
वसई-विरार शहरातील तसेच महामार्गावर पडलेले खड्डे पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात बुजवले होते, मात्र ते खड्डे पुन्हा जैसे थे अवस्थेत आहेत. याकडे पालिका कानाडोळा करत असल्याचा आरोप करण्यात आला.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार?

दीड तास आयुक्तांच्या केबिनबाहेर बसून केलेल्या ठिय्या आंदोलनाची आयुक्तांनी दखल घेतली आणि जे वॉल मन पाणी सोडण्यासाठी पैसे घेतात. निकृष्ठ रस्त्याची काम

करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले, अशी माहिती मयुरेश वाघ आणि सुदेश चौधरी यानी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button