[म्हैसगांव येथे वन विभागात नाल्याची खुदाई मोठ्या प्रमाणात वृक्षाची नासाडी ;वृक्ष कापून दिले व्यापाऱ्यांना ]

[म्हैसगांव वन विभागात वृक्ष तोड झाली पण ते गेलीतरी कुठे ? ]
राहुरी प्रतिनिधी ( दत्ता जोगदंड ) : राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथे मोठ्या प्रमाणत वृक्ष असलेल्या ठिकाणी वन विभागामध्ये पाणी साठवण्यासाठी त्या ठिकाणी नाले तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणतया वृक्ष तोड करून व्यापारीला देण्यात आली असून त्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून कुठे घेऊन गेला आहे हा प्रश्न अनुत्तीर्ण झाला आहे .
नाले तयार करण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय मोठी मोठी वृक्ष होती त्या मध्ये निलगिरी , लिंब , आपाटा ‘ करंजी , बांबु , सुबाभळ , आंबा , व इतर मोठी मोठी वृक्ष होती त्या ठिकाणी नाले तयार करण्यासाठी अडचण येते होती या वर वन विभागचे कमचारी यांनी म्हैसगांव , कोळेवाडी , दरडगांव थडी , चिखलठाण मधील काटणी करण्यासाठी वृक्ष व्यापारीला दिले त्याने ही वन विभागातील सर्व वृक्ष मशीनच्या साह्याने काटणी केली व ते करू २५ पेक्ष जास्त वाहनामध्ये टाकून घेऊन गेले त्या नंतर त्या ठिकाणी नाले तयार करण्यात आले परंतु ऐवढे वृक्ष काटणी करू घेऊ गेले तरी कुठे व त्यांनी दिले ते पैसे नेमकी गेले कुठे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे .
नाले तयार करण्यासाठी जवळ नाले तयार केले पण किती केले हे मात्र गुलदस्त्यात आहे या नाल्या मध्ये पाणी राहत नाही त्या नाल्यासाठी वृक्षची नासाडी ही मोठ्या प्रमाणत झाली आहे हे नाले वृक्षसाठी केले आहे परंतु त्या नाल्या मध्ये पाणी राहत नाही त्याचा उपयोग तरी काय शासनाने खुप खर्चे केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्या ठिकाणी तरी वृक्ष काटणी झाली तर त्या ठिकाणी नवीन तरी वृक्ष लागवड करणे गरजेचे होत त्या कडे वन विभागने दुरू लक्ष केले आहे नाले शेतकाऱ्यासाठी बनवले की काय असे प्रश्न निर्माण झाले आहे . वन विभाग त्या पाण्या पासुन वंचीत आहे . त्या नंतर त्या ठिकाणी एक ही नवीन वृक्ष लागवड करण्यात आली नाही त्या मुळे वन विभागा चे दुरु लक्ष देत आहे त्या मध्ये वनरक्षक वन विभागाचे भक्षक बणले की काय असे प्रश्न ग्रामस्थामध्ये बोलले जात आहे हेच कायम राहिले तर वन नष्ठ झाल्या शिवाय राहणार नाही यात काही शंक नाही असे बोलले जात नाही .


[वन विभागात शासनाकडून निधी येऊन नाले तयार करण्यात आले आहे परंतु त्या नाल्यामध्ये पाणी साचत नाही त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही . . . . . विलास गागरे ( मा .उपसरपंच म्हैसगाव , राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर उपअध्यक्ष ) ]

[म्हैसगांवा मध्ये वृक्ष तोड झाली नाही कोणतेही गाड्या वृक्षाचे कट करून घेऊन गेले नाही याबाबत आम्हाला कोणतेही कल्पना नाही … . . . . वाय .जे .पाचारणे ]
[ म्हैसगावचे वनरक्षक गोडेकर यांना वक्ष तोडीची व नाले तयार किती केले शासनाने किती पैसे दिले ही महिती विचारण्यासाठी फोन केला असता फोन उचलला नाही व कट केला ]
छाया :- कमलेश विधाटे ( म्हैसगांव )



