महाराष्ट्रसामाजिक
पांगराबंदी येथील सिंचन तलावाचा दरवाजा उघडून अज्ञात व्यक्ती ने पाणी सोडले

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव -:पांगराबंदी येथील सिंचन तलावाचा दरवाजा उघडून तलावातील पाणी सोडून देण्यात आले असून या अगोदर ही बरेच वेळा या तलावतील पाणी सोडण्यात आले सध्यास्थिती पावसाळा सुरु होण्या आधी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील मशागतीचे कामे केली ऐक पाऊस झाला कि पेरणी करावी लागते हा मानस बाळगून पांगरा बंदी येथील सौ रंजनाताई उमाकांतराव घुगे ( पांगरेकर ) यांनी आपल्या शेतातील सर्व कामे करून घेतली परंतु अज्ञात व्यक्तीद्वारे सिंचन तलावाचा दरवाजा उघडून पाणी सोडल्याने पांगराबंदी येथील उमाकांतराव घुगे यांच्या शेतात सर्व पाणी जमा झाले सध्यास्तितीत तलावामधून पाणी जाणे सुरूच आहें घुगे यांनी सामान्धीतांना वारंवार कळवूनही ते या बाबीवर दुर्लक्ष करीत असल्याने उमाकांतराव घुगे यांच्या शेतात मोठ्या प्रमानामध्ये पाणी जात असल्याने त्यांनी आता पेरणी कशी करायची त्याच्या शेताचे प्रचंड नुस्कान होऊन ओलावा निर्माण झाला तरी संबंधितांनी यावर लक्ष देऊन कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पांगरा बंदी येथील शेतकरी उमाकांतराव घुगे यांनी यांनी केली आहें.
या अगोदरही बरेच वेळा अज्ञातकडून पांगराबंदी सिंचन तलावाचे गेट खुले करून पाणी सोडून देण्यात आले होते सदर बाबीचा विचार करून यावर कायमस्वरूपी पर्याय काढावा उमाकांतराव घुगे यांनी केली आहे.



