आषाढ पर्णिमा बौद्ध धम्म स्थापना दिन

: जयसिंग वाघ जळगाव :- सिद्धार्थ गौतम यांना ज्ञान प्राप्ती झाल्या नंतर ते बुद्ध म्हणून ओळखले जावू लागले . बुद्ध झाल्या नंतर त्यांनी सारनाथ येथील मृगदाय वनात आषाढ पौर्णिमेस पाच तपस्विं समोर पाहिले प्रवचन दिले , त्या प्रवचनाने प्रभावित होऊन ते तपस्वी बुध्दांना शरण गेले व बुद्धानुयायी झाले . त्यानंतर गौतम बुद्ध यांनी अधिकृतरित्या बौद्ध धम्म स्थापन केला व बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारार्थ भिख्खू संघ स्थापन केला त्यामुळे आषाढ पौर्णिमा हा दिवस ‘ बौद्ध धम्म स्थापना दिवस ‘ ठरतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले . जळगाव येथील जेतवन बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमे निमित्त २१ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात वाघ बोलत होते . आपल्या भाषणात जयसिंग वाघ यांनी पुढं सांगितले की , धर्म व धम्म या भिन्न भिन्न संकल्पना आहेत . गौतम बुद्ध यांनी धर्म नाही तर धम्म स्थापन केला आहे . गौतम बुद्ध यांनी जे त्रीसरण दिले आहेत त्यात ‘ धम्मम सरणम गच्छामी ‘ येक आहे . मात्र बौद्ध धम्मास रूढ अर्थाने बौद्ध धर्म असेच संबोधले जाते . आज जगात अनेक धर्म आहेत मात्र त्या सर्व धर्मांची निर्मिती बौद्ध धर्मा नंतरची आहे हे दिसून येते . काही धर्म हे धर्म म्हणून नाही तर संस्कृती म्हणून ओळखले जातात ही बाब समजून घ्यावी असेही वाघ यांनी स्पष्ट केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिंठा हाउसिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे होते .सुरवातीस विजया शेजवळे , ज्योती भालेराव , कविता सपकाळे यांनी आषाढ पौर्णिमाचे महत्व सांगितले . सूत्रसंचालन अशोक सैंदाणे , प्रास्ताविक दिलीप तासखेडकर, आभार नथू अहिरे , परिचय उज्वला तायडे यांनी केले . सुरवातीस भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . नूतन तासखेडकर , मीना बिऱ्हाडे, वर्षा कोचुरे यांनी बुद्ध वंदना घेतली . कमल सोनवणे , चारुलता सुरळके , पूजा कोचूरे , गीता सोनवणे , सुनंदा वाघ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . कुसुम सोनवणे , सोनी साळुंके , जमुणाबाई साळवे , मीना शेजवळे, सोनी साळुंके , सरला भालेराव , वत्सला वानखेडे , प्रतिभा मोहोळ , कल्पना नंन्नवरे आदींसह स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते .



