भारतरत्न महामानव विश्वरत्न प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा मूर्ती स्थापनेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
शारदा संजय पवार.
महामानव विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज मूर्ती स्थापना करण्यात आली या मूर्ती स्थापने मागे खूप मोठा हेतू आहे बाबासाहेबांचे विचार शिक्षणाचा संदेश सामाजिक बंधुत्व न्यायची प्रेरणा घराघरांमध्ये पोहोचविणे हा आहे
नुसती मूर्ती स्थापना करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणे नव्हे. त्यांच्या विचारांचे आचरण करणे शिक्षणाचा प्रसार करणे. शिक्षणाला प्राधान्य देणे अंधश्रद्धा अन्यायाविरुद्ध उभे राहणे. समाजामध्ये समानतेची भावना निर्माण करणे एकजुटीने राहणे
हे खरे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणे आहे.
ही मूर्ती गावातील युवक आणि विद्यार्थिनी साठी प्रेरणास्थान ठरेल
बाबासाहेबांनी दिलेल्या”शिका संघटित व्हा संघर्ष करा“हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी चालवलेली चळवळ म्हणजेच मूर्ती स्थापना होय



